कुटुंब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुटुंब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

उर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा


अनेकदा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारची जाणीव होते कारण वास्तू मध्ये असलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगत असते किंवा त्या व्यक्तीमुळे वास्तूमध्ये गेलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असे फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकान, कारखाना, सार्वजनिक ठिकाणे किंवा पुरातन ठिकाणे हे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा हि ऊर्जा वास्तू मधून व्यक्तीकडे किंवा व्यक्तीमधून वास्तू कडे जात असते. ज्याची ऊर्जा शक्तिशाली ती समोरच्याच्या ऊर्जेचा ताबा घेते व त्याचे आयुष्य आपल्यानुसार चांगले किंवा वाईट घडवत जाते.

सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अश्या ऊर्जा असतात.

सकारात्मक ऊर्जा हि सकारात्मक परिणाम देत जाते, तटस्थ ऊर्जा हि आहे तसे चालू ठेवते मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक परिणाम देते.

साधे तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही वेळ एका सकारात्मक व्यक्ती सोबत रहा आणि काही वेळ एका नकारात्मक व्यक्तीसोबत रहा मग बघा कसा तुमच्यात बदल घडतो ते. तुम्हाला सकारात्मक व्यक्तीसोबत राहताना सकारात्मक जाणीव निर्माण होईल आणि नकारात्मक व्यक्तीसोबत राहताना नकारात्मक जाणीव निर्माण होईल. तुम्ही ऊर्जेचा अनुभव घ्याल, तुमची ऊर्जा सकारात्मक होताना आणि नकारात्मक होताना अनुभवाल. असेच काही सकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर सकारात्मक ऊर्जेची जाणीव होईल आणि नकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर नकारात्मक जाणीव निर्माण होईल. कोणीही हा प्रयोग करून बघू शकते आणि तुम्हाला विश्वास देखील बसेल कि कसे ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात ते.

नजर लागू नये म्हणून बाळाला काळा टीका लावताना बघितले असेलच कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात बाळाला बघून चांगले वाईट विचार मनात येत असतात त्यामधील तर चांगले विचार सोडले कि वाईट विचार व ऊर्जा बाळाच्या ऊर्जेला दुषित करू शकते व अगदी लहानपणापासून त्याला विध संकटे व समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून त्याला काळा टीका लावला जातो जेणेकरून व्यक्तीची नजर पहिले तिथे जाते व तो काळा टीका फक्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानंतर बाळाला फक्त सकारात्मक ऊर्जा मिळते.

आता वरील ऊदाहरण हे बाळाचे झाले आता आपण घराचे बघू. बाळाच्या जागी घराचे चित्र च्या आणि मुंबई मध्ये इमारतीचे. अश्या किती लोकांच्या नजरा लागत असतील? ज्यांनी नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी काही ऊपाय केले असतील ते ठीक आहेत पण ज्यांनी नसेल केले त्यांचे काय? त्यांना किती समस्यांमधून जावे लागत असेल? जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना असे वाटत असेल कि मालक किती श्रीमंत आहे म्हणून त्यांना एक वास्तव पुढच्या परिच्छेद मध्ये सांगतो ते वाचा.

एकदा एक श्रीमंत व्यवसायिक माझ्याकडे आला होता, त्याच्या व्यवसायाची ऊलाढाल हि करोडो मध्ये होती, घर आलिशान, गाड्या अश्या सर्व ऐषारामाच्या वस्तू होत्या. हि झाली एक बाजू पण त्या व्यक्तीचे किती रुपये बाजारपेठेत अडकले होते हे माहिती आहे का? ती व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्यासाठी तिला श्रीमंत वस्तीत रहायचेच आहे, त्यांच्यासारखे आयुष्य हे जगायचेच आहे ह्यामध्ये काही गैर नाही, साधी राहणीमान हे सिनेमामध्ये ठीक आहे पण वास्तवात हा नियम जबरदस्तीने सर्वांना लागू करू शकत नाही. जेव्हा त्या व्यक्तीची अचानक करोडो रुपयांची येणारी कमाई हि ठप्प होवून जाते तेव्हा त्याने काय करावे? त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या कायमस्वरूपी, कंत्राटी रोजंदारीवर असलेल्या लोकांना पगार कसा द्यायचा? स्वतःचे घर कसे चालवायचे? कुटुंबाचा खर्च, मुलांचा जर घरी कोण आजारी असेल तो खर्च भागवायचा कसा? लोकांकडे पैसे मागायचे तरी कसे? असे एक न अनेक प्रश्न अंतर्मनात वादळ ऊठवतात.

सर्वकाही ठीक असताना असे झाले कसे? कारण बायकोची बहीण जी नकारात्मक होती आणि तिला आपल्या बहिणीची प्रगती बघवत नव्हती, तीची नजर हि जिजाजी वर पण होती, ती विविध मार्ग वापरून त्यांचे वाईट कसे होईल हा विचार करत असायची असे करत एकदा तिच्या जाळ्यात जिजाजी अडकतात व त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, आणि तुम्हाला माहितीच असेल कि किती प्रचंड ऊर्जा हि मुक्त होते आणि तिची देवाणघेवाण होते ते, मग तिची नकारात्मक ऊर्जा हि जीजाजींमध्ये जाते व तिथून त्यांच्या आयुष्यात व्यवसायात प्रचंड मोठी ऊतरती कळा लागते. हीच ऊर्जा मग वास्तू शोषून घेते त्यामधील वस्तू शोषून घेतात.

म्हणजे विचार करा कि कसे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते. आपल्याला निर्माण निसर्गाने केलेले आहे ब्रम्हांडाने केलेले आहे. त्यामुळे आपण जेवढे समजू तितके कमी आहे कारण इतक्या प्रचंड मोठ्या ब्रम्हांडात आपण एक ग्रहावर आहोत अजून आपल्याला बरेच काही शोधायचे आहे जे कधीच शक्य होणार नाही पण मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्याचा शोध लावू शकतो, क्वांटम फिजिक्स देखील ऊपयोगी येवू शकतो, आता आपण भौतिक पासून एनर्जी म्हणजे ऊर्जा शास्त्राकडे जाणार आहोत.

अध्यात्मामध्ये सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील विविध प्रयोगानी सिद्ध केलेले आहे कि नकारात्मक विचार किंवा लोकांचा प्रभाव हा आल्यावर नकारात्मक पडतो म्हणून. जितके तुम्ही नकारात्मक लोक परिस्थिती विचार आणि भावनांपासून लांब रहाल तितके तुम्ही समृद्ध आयुष्य जगाल ज्यामध्ये सुख समाधान आणि श्रीमंती देखील आली.

जर ह्या श्रीमंत व्यवसायिकाने एखादी नकारात्मक माहिती बाहेरच्या जगात पसरवली असती तरी लोकांचे लक्ष विचलित झाले असते व नजर नसती लागली आणि नाही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला असता. नशीब चांगले कि कुणाला मोठा न बरा होणारा आजार झाला नाही किंवा इतर कारणाने कुणाच्या जीवावर बेतले नाही नाहीतर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असते तात्पुरते किंवा कायमस्वरूपी. नंतर शेवटी घराची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागलेच. म्हणून आयुष्य जगताना थोडी काळजी घेतलेली बरी कारण नंतर होणारे सर्व नुकसान टाळले जातात किंवा त्यांची तीव्रता हि कमी करतात.

साधे नकारात्मक विचार बोलून एक छोटासा खिळा जरी ठोकला तरी पुरेसे सर्व बरबाद करायला जसे एक नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात शिरतो व सर्व बरबाद करून टाकतो तसे. मग जसे तो खिळा शोधायला कठीण असतो तसे तो एक नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शोधणे देखील तितकेच कठीण असते.

म्हणून बोलतो आयुष्य जगताना १०० % सकारात्मक जगा पण लोकांना ९९ % दाखवा आणि १ % नकारात्मक दाखवा जेणेकरून ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत आणि नाही कोणी तुमचे आयुष्य ऊध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.

मी इथे जे ऊदाहरण दिले आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठेवून वाचू शकतात जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथे कुठलेही ऊपाय सांगितले नाही कारण जो पर्यंत समस्या काय आहे त्याचे मूळ कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत कुठलेही ऊपाय करू नका, अगदी लहान समस्या दूर होतील पण मोठ्या समस्या अजून चिघळत जातील. लोकांनी अशीच पुस्तके वाचून ऊपाय वाचून स्वतःला आजारी पडले होते. वेळोवेळी तज्ञांची मदत घेतलेली केव्हाही ऊत्तम.

जर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे, व्हास्टएप द्वारे शेअर कराल. appointment बुक करण्यासाठी पूर्ण नाव आणि जिल्हा टाईप करून पाठवा. फी पेड झाल्यावरच  appointment बुक केली जाईल.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #ऊपचार ऊपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे



जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अगोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.

जेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे.  जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.

असे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.

अगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.

स्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल? शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.

विवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय नातेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.

नात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.

पुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.

माझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.

लोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : Balak Palak Children Parents

नकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो?



आपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.

जी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल?

घरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल?

मानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

स्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल?

काही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील?

जर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल?

अति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील?

मुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल?

मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल?

लहान किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल?

घरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.

दुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल?

मुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.

स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.

पायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.

साधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय? मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.

अनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्यापासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

भविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे



तुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता.

आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो आपण त्यांच्यासारखेच बनतो.

तुम्ही कोणासोबत राहता हे तपासा. तुम्हाला त्यांचे कुठले गुण आवडतात आणि कुठले नाही हे लिहून ठेवा. तपासल्यानंतर तुम्हाला समजून येईल कि तुम्ही कोठे चालला आहात ते.

मनुष्य हा समुहात राहणारा प्राणी आहे. सामाजिक प्राणी आहे. आपण ज्या समुहात राहतो, त्यांचे प्रत्येकाचे नियम असतात ते आपण आचरणात आणत असतो. नकळत आपल्या अंतरमनात हे सर्व आचरण कायस्वरूपी बसते व नकळत आपण दररोज तशी कृती करत जातो.

तुम्हाला यशस्वी बनायचे आहे?
यशस्वी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे आहे?
आनंदी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे आहे?
निरोगी आयुष्य जगणाऱ्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला धाडसी बनायचे आहे?
धाडसी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे?
आत्मविश्वासू लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला अंतर्मनाची शक्ती जागृत करायची आहे?
ज्यांची अंतर्मनाची शक्ती जागृत झाली अश्यांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला भाग्यशाली आयुष्य जगायचे आहे?
भाग्यशाली लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला गरुडझेप घायची आहे?
गरुडांच्या समुहात रहायला सुरवात करा.
गरुड कबूतरांसोबत उडत नाही आणि राहत देखील नाही.

तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुणासोबत घालवता त्यावरून तुम्ही घडत जाता व तुम्ही तशी परिस्थिती देखील निर्माण करतात.

जर तुम्हाला यशस्वी लोकांचा सहवास भेटत नसेल तर तज्ञांच्या सहवासात रहा.

वेळ हि वाळूसारखी निसटून जात असते त्या सोबत तुमचे आयुष्य देखील. जो काही निर्णय घ्यायचा तो आज घ्या. वेळ कुणासाठीही थांबत नसते.

तुमच्या परिसरातील ऑफलाईन समविचारी आणि कृतीशील लोक भेटत नसतील तर ऑनलाईन त्यांना शोधा व त्यांच्या संपर्कात रहा.

सकारात्मक भावना आणि कंपने जुळण येणाऱ्या लोकांसोबत रहा आणि नकारात्मक भावना आणि कंपने जुळून येणाऱ्या लोकांपासून लांब रहा.

ऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त आयुष्य जगा.

लवकरच समविचारी कृतीशील लोकांचा समूह बनवण्यात येईल. ह्या समुहात येण्यासाठी मागील सर्व नकारात्मक पूल तोडावी लागतील व परतीचा मार्ग बंद करावा लागेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

घरगुती निर्माण होणारे ताण तणाव व त्यामुळे होणारे गंभीर गुन्हे - भाग १



पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला आणि कारण होते कि पत्नी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पती कडे पैसे मागत होती.

हे कारण शुल्लक वाटत आहे पण ह्यामागे स्वभाव आणि सवय देखील लपलेली आहे.

पती रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. लग्नाला ११ वर्षे होवून गेली. पती सर्व पैसे दारूत घालवायचा. घरखर्चाला पैसे देत नव्हता. पैश्यांवरून इतकी वर्षे भांडणे होत होती.

खुनाच्या अगोदर जेव्हा पती दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी ने मुलाच्या शाळेच्या फी साठी पैसे मागितले व ह्यावरून परत भांडण सुरु झाले. पती ला राग अनावर झाला व त्याने पत्नी चा गळा आवळून खून केला.

पतीला काही पश्चाताप नाही झाला, उलट त्याने हत्येला आत्महत्येत बदलण्याचा प्रयत्न केला, मृतदेह हा छताला लटकवून फरार झाला.

शेवटी सत्य हे बाहेर आलेच, शवविच्छेदनात मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पती पत्नी मध्ये भांडणे होतात व नाही देखील, असा काही नियम अहि कि लग्न झाल्यावर भांडणे हि झालीच पाहिजे, हे प्रेमाचे प्रतिक आहे वगैरे, हा शुद्ध मुर्खपणा आहे.

जर वरील घटनेतील स्त्री ने स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत वेगळे रहायचा निर्णय घेतला असता तर तिला आयुष्याची ११ वर्षे वाया घालवावी नसती लागली.

पती ना परमेश्वर असतो, ना पत्नी लक्ष्मी आणि ना हि विवाह कायमस्वरूपी बंधन असते. हे सर्व मानसिक बंधने, आणि खोटे विश्वास असतात.

शेवटी पत्नील जीव गमवावाच लागला ना? जिवापेक्षा महत्वाचे काहीही नाही. आणि किती वर्षे भांडण करण्यात घालवायचे? मग जगायचे कधी? ह्यालाच आयुष्य बोलतात का? कोणी समाज तरी आला का जीव वाचवायला? समाजानेच कठोर नियम बनवले आहे ना?

स्त्रियांसाठी कठोर कायदे बनवले आहे पण त्याचा दुरुपयोग जास्त होतो आन ज्यांना गरज आहे अश्या स्त्रियांना न्याय देखील भेटत नाही आणि उशिरा न्याय भेटल्याचा काहीही फायदा नाही.

हे गरीब ते श्रीमंत अश्या सर्व घरात आढळून येते, एड्स सारखे विचार करू नका कि एड्स फक्त विशिष्ट वर्गांच्या लोकांना होतो असे बोलत गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत एकमेकांकडे बोट दाखवत बसतात.

लग्नानंतर ३ महिने ते ३ वर्ष पुरेसी आहेत निर्णय घ्यायला, आणि मुल होण्याच्या अगोदर जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, कारण एकदा का तुम्ही मुल वाढवण्यात व्यस्त झालात तर अजून काही वर्षे भुरकन उडून जातात व समस्या हि आक्राळ विक्राळ रूप घेते.

दारू तर अनेक लोक पितात पण सर्व काही बायकोला मारत नाही किंवा खून करत नाही, जर व्यक्ती खुनशी स्वभावाची असेल तर तर ती खून करणारच.

११ वर्षे पती चा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती तर मग वेगळे होवून तीच सहनशक्ती आयुष्य परत सुरु करण्यासाठी का नाही वापरली? उलट तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात चांगली झाली असती.

स्त्रियांनी मानसिक गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. जग तुमच्यासाठी बनलेले आहे, तुम्ही रपत सुरवात करू शकता, अश्या अनेक स्त्रिया आहे ज्यांना नवर्यानी सोडले पण त्यांनी प्रगती केली. चौकटीतून बाहेर पडा.

वैवाहिक जोडीदार फक्त पुरुष नाही तर महिला देखील स्वभावाने वाईट असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थिती नुसार अदलाबदल करून लेख वाचू शकतात, नाण्याच्या दोन्ही बाजू बघत जा.

ज्या स्त्रिया अश्या किंवा इतर कुठल्याही मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात आहे त्यांच्यासाठी विशेष समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध आहेत, ह्याचा फायदा घेवून स्त्रिया नकारात्मक आयुष्यातून बाहेर पडून आपले नवीन आयुष्य घडवू शकतात.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध