बालक पालक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बालक पालक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गर्भ संस्कार आणि संस्कार मुलांना अद्भुत शक्ती असलेले सुपरहिरो बनवू शकतात



महाभारतातील अभिमन्यू ची कथा तुम्हाला माहितीच असेल. तो कमी वयाचा असून मोठ मोठे महारथी योद्धा जे चक्र्व्युव्ह भेदू नाही शकत ते अभिमन्यू भेदू शकला कारण त्याला गर्भात असताना चक्रव्यूह कसे भेदायचे हे सागितले गेले होते. ह्याला म्हणतात संस्काराची शक्ती.

तुम्ही तुमच्या मुलांना कुठले संस्कार देत आहात?

तुम्ही मुलांना जाणते अजाणतेपणे काय शिकवत आहात?

मुल गर्भात असतांना आई च्या भावना, कंपने आणि उर्जेने शिकतो तर जन्म झाल्यावर कुटुंबातील वातावरणाने शिकतो. हे शिक्षण त्याचा स्वभाव बनून जाते आणि तुम्हाला माहिती असेल कि स्वभाव हा बदलू शकत नाही.

स्वभाव हा अनुवांशिकतेवर देखील अवलंबून असतो. काहींचे जीन्स तसे असतात जेणेकरून पिढीजात संस्कार पुढे सरकत जातात व इथे गर्भसंस्कार किंवा संस्कार देण्याची गरज भासत नाही.

तुम्ही मुलांना कसे वाढवता?

किंवा

तुम्ही कुठल्या वातावरणात वाढला आहात?

जर मुलांचा विश्वास हा दृढ ठेवला व त्यासोबत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले कि ते तुम्ही शिकवलेले कधीही विसरत नाही आणि त्यांची कृती देखील चुकत नाही.

पालकांना वाटत असेल कि ते मुलांना काही शिकवत नाही पण ते तुमचे वागणे बघून शिकत जातात व तो त्यांचा स्वभाव बनत जातो.

तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कुठले सोफ्टवेअर इंस्टाल करत आहात?

तुमची तुमच्या मुलांना काळानुसार बदलणारे संस्कार देत आहात कि नाही?

संस्कृती, परंपरा आणि धर्म टिकवण्यासाठी अनेकदा जे गरजेचे नाही त्यावर लक्ष्य केंद्रित करून विना गरजेचे संस्कार टिकवून ठेवले जातात पण जे गरजेचे आहेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य केले जाते.

आपले अध्यात्म इतके समृद्ध आहे कि त्यामधील थोडे थोडे ज्ञान देखील तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार स्वरुपात देत गेलात तरी ते त्यांच्यातील अद्भुत शक्ती जागृत करू शकतील.

मुलं काही एका दिवसात मोठी होत नाही तर काही वर्षे जावू द्यावी लागतात. २० वर्षांपासून जो प्रयोग सुरु केला होता त्याने ५ ते १० वर्षांनंतर रिझल्ट दिला ते देखील १०० %.

टीव्हीवर फक्त ठराविक चेहरे समोर येतात किंवा ज्यांना इमेज मार्केटिंग करायची असते त्यांची जीवनगाथा आपण टीव्हीवर बघतो पण असे अनेक आहेत जे टीव्हीवर येत नाही पण क्षमता तशीच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. प्रसिद्ध होणे न होणे आपल्यावर अवलंबून आहे.

काही मुलांची मानसिक क्षमता वाढली, काही फक्त डोळ्यांनी कुणाही एका व्यक्तीला किंवा समूहाला संमोहित करू शकतात. काहींनी मेंदूची क्षमता वाढली व ते मेंदूच पुरेपूर वापर करू शकतात. काहींनी शारीरिक क्षमता वाढवली आणि ते खेळ व खेळ सलग्न क्षेत्रात पुढे गेलेले आहे. हि सर्व मुल काळानुसार जगत आहेत व त्यांना जसे आयुष्य पाहिजे तसे जगत आहे. कुठेही अतिरेक नाही किंवा काही नाही.

आपल्या अध्यात्मात १४ विद्या आणि ६४ कला आहेत आणि ह्या सर्व कलांमध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण पारंगत होते. आणि हेच संस्कार स्वरुपात तुमच्या मुलांना दिले जाते जेणेकरून ते एखाद्या सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतील.

आपण ऐकतो ना कि ह्या व्यक्तीवर हा हा देव प्रसन्न आहे म्हणून ह्यामागे देखील संस्कारच वास्तव आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत जे बोलत असतात कि लक्ष्मी आणि कुबेर प्रसन्न आहे म्हणून, सरस्वती आणि गणपती प्रसन्न आहे म्हणून, कुलदैवत प्रसन्न आहे म्हणून त्याचे कारण संस्कार आहेत.

महादेव, लक्ष्मी, कुबेर, पार्वती, गणपती, विष्णू, सरस्वती किंवा इतर कुठलेही देव ह्यांनी तुम्हाला त्यांचा थोडा अंश जरी दिला तरी तुम्ही सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतात पण त्यासाठी तुमचे शरीर संस्काराने तसे तयार झाले पाहिजे.

आताचे यशस्वी लोक ज्यांच्यावर शास्त्रज्ञानी संशोधन केले आहे त्यांनी सरावात अनेक वर्षे सातत्य ठेवले आहे किंवा त्यांना तसे संस्कार भेटले आहेत. हा सर्व डाटा उपलब्ध आहे, त्या सुपरहिरो लोकांवर प्रयोग केले गेले आहे, शेवटी शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला कि त्यांची मानसिकता, अनेक वर्षांचा सराव आणि संस्कार ह्यांनी त्यांना सुपर हिरो बनवले आहे.

मुल लहान असताना लवकर शिकते व आपल्यात कमी वयात अद्भुत शक्ती, क्षमता जागृत करते, त्याच मुलाचे वय वाढ गेल्यावर देखील तो आपली अद्भुत शक्ती किंवा क्षमता निर्माण करू शकतो फक्त थोडा वेळ जास्त लागेल बाकी सर्व नियम सारखेच आहे.

तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये अद्भुत क्षमता जागृत करायच्या आहेत? कोर्स आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. आजच संपर्क करा.

तुमच्या म्हणजे पालकांच्या आणि मुलांच्या कुठल्याही समस्या का असेना त्या सर्वांवर समाधान आहे. तुमचा एक व्हास्टएप मेसेज तुमचे आयुष्य बदलू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

बाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी



बाल कलाकार
कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी

अनेक सिनेमा आणि सीरिअल मध्ये बाल कलाकारांची गरज लागते. त्यांना तिथे त्यांची नैसर्गिक कला दाखवता येते.

हंसिका मोटवानी जिने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते ती आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

आमीर खान ह्याने देखील बाल कलाकार म्हणून काम केले होते व आज तुम्ही तो किती प्रसिद्ध अभिनेता आहे हे बघू शकता.

वरील नावे फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. हा लेख कोण कोणी व किती बाल कलाकार होवून गेले हे सांगण्याचा नाही तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात कशी यश व प्रसिद्धी मिळवून द्यायचे हा आहे.

जसे बोल गेट्स चे कमी वयात यशस्वी झाला म्हणून दाखले दिले जातात तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध मुलांचे देखील आहे आणि सिनेमा देखील त्यापैकी एक क्षेत्र आहे.

काहींना ध्येय जन्मापासून किंवा लहानपणी मिळून जाते तर बहुतेक लोक हि नंतर ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करतात. हि सर्व काही बिल गेट्स सारखी प्रोस्ताहन देणारी पुस्तके लिहित नाही.

हर्षाली मल्होत्रा ह्या बाल कलाकाराने बजरंगी भाईजान ह्या सलमान खान च्या सिनेमात काम केले होते त्या वेळी तिला २, ३ लाख रुपये मानधन मिळाले होते.

बाजारपेठ बोला किंवा वास्तव आयुष्य बोला हे असेच असते, इथे कोणी वय मानत नाही. तुमच्यात धमक आहे तर उतरा बाजारपेठेत आणि तुम्हाला हवे ते घेवून जा. इतिहासात देखील अशी उदाहरणे आहेत जिथे कमी वयात राजपाट सांभाळले गेले आहे.

म्हणजे काळ कुठलाही असो त्यामध्ये तुम्हाला संधी आहे. अमीर खान, हंसिका मोटवानी आणि हर्षाली मल्होत्रा अशी मी वेगवेगळ्या काळात सुरुवात केलेल्या कलाकारांची उदाहरणे दिली आहे ती ह्यासाठी कि तुम्ही बोलायला नको कि काळ हा तुमच्या प्रगतीसाठी आणी ध्येय गाठण्यासाठी अडथळा बनत आहे.

तुम्हाला काय वाटते कि तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात आणि तुम्ही तिथली गर्दी अनुभवता व विचार करता कि विमानतळावर गर्दीच नसते म्हणून? कधी विमानतळावर ह्या तेव्हा समजेल कि किती गर्दी तिथे देखील असते म्हणून. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना स्पर्धेचा सामना हा करावाच लागतो.

हा लेख ह्यासाठी लिहित आहे कि पारंपारिक मार्ग सोडून मराठी पालकांनी जग बघावे, काही पालक विनाकारण मुलांवर दबाव टाकून त्यांना तणाव आणि नैराश्याने ग्रस्त करत होते आणि स्वतःमध्ये काही बदल करून ह्या मार्गात कसे टिकावे ह्यासाठी.

काही पालक हे हुशार असतात आणि ते असे वेगळे मार्ग अवलंबवून आपल्या मुलांचे भविष्य हे सुखकर करून ठेवतात. ते स्वतः मुलांना प्रोस्ताहित करतात, शिक्षणासोबत जिथे मुलांना प्रात्यक्षिक करण्याची संधी भेटेल म्हणून प्रयत्न करत असतात.

मला जी लोक आयुष्यात यशस्वी झालेली दिसली त्या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोस्ताहन दिले होते आणि जी यशस्वी नाही झाली त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रोस्ताहन भेटले नव्हते. म्हणून मी प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि संस्कारांना पर्याय नाही.

यश वय बघत नाही, जिथे यशासाठी सुपीक पोषक वातावरण असते तिथे यश हे येतेच, कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरात यशाचे सुपीक पोषक वातावरण निर्माण करा, मुलांना तसे बनवा आणि बघा कसे तुम्ही आणि तुमची मुल यशस्वी होतात ते.

अनेकांना वाटते कि लहान मुलांना काही समजत नाही पण हे साफ चुकीचे आहे, त्यांच्यात जो समजूतदारपणा आढळून आला तो त्यांच्या आई वडिलांमध्ये देखील आढळून नाही आला. लहान मुलांना माहिती असते कि काय योग्य आहे आणि काय अयोग्य ते पण आई वडील अनेकदा वयाने मोठे असण्याच्या गर्वात असतात व मुलांचा समजूतदारपणा हा दुर्लक्षित करतात व त्यांना मारून रागावून त्यांच्यासारखे नकारात्मक बनवतात.

मुलांना तुम्ही जसे संस्कार देतील तसेच ते बनतील. तुम्ही योग्य संस्कार द्या ते आयुष्यात भरभराट करतील आणि अयोग्य संस्कार द्या ते आयुष्य आणि कुटुंब बरबाद करतील.

तुम्हाला मुलांना तयार करण्यासाठी किंवा त्यांच्यातील जन्मजात गुणांना वाव देण्यासाठी सुरवातीला मानसिकतेवर काम करावे लागेल आणी त्यानंतर व्यवसायिक वाटचाल करावी लागेल. जितकी मानसिकता सक्षम आणि खोल त्यापेक्षा अनेक पटीने यशाची इमारत उंच किंवा मजबूत पाया असलेली.

इथे मुलांसोबत पालकांवर देखील काम करावे लागते. मुलांकडे कौशल्य असते पण त्याला योग्य दिशा देण्याचे काम पालक करत असतात त्यासाठी पालकांना देखील योग्य दिशेचे ज्ञान असले पाहिजे.

मुलं जे निरागसपणे आणि मनापासून कला सादर करत असतानाचा बघण्याचा आनंदच वेगळा असतो. एक दैवी क्षण असतो तो. जिथे मुलांवर काम करण्याची गरज असते तिथे मुलांवर काम केले जाते आणि जिथे पालकांवर जबाबदारी असते तिथे पालकांवर काम केले जाते.

एकदम सोपे आहे, मुलांची नैसर्गिक क्षमता, पालकांचे प्रोस्ताहन आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळून मुलं कमी वयात यशस्वी होतात एक पैश्यांचा ओघच त्यांच्या आयुष्यात सुरु होतो. अनेकांचे आयुष्य एका घटनेने बदलले बघितले आहे.

आजकालची मुलं हि हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कि त्यांना कसे वागायचे आहे, कसे बोलायचे आहे, कसे कपडे परिधान करायचे आहे, कशी एक्टिंग करायची आहे आणि हे सगळे नैसर्गिक त्यांच्यामधून येत असते त्यामुळे विनाकारण मेंदूवर ताण देवून तणावात ते जात नाही. पण ज्यांना लहानपणी योग्य पोषक वातवरण आणि तज्ञांचे मार्गदर्शन भेटले नाही त्यांना मोठे झाल्यावर तणावाचा सामना करावा लागतो.

मग वाट कसली बघत आहात? तुमच्यासमोर मार्ग आहे फक्त वाटचाल करायची आहे. पुढील लेखात मी इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट चा वापर करून लहान मुलं कसे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर मांडतात आणि यशस्वी होतात ते.

मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष कोर्स तयार केलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता. स्पर्धेला घाबरू नका कारण स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय आरामात गाठू शकतात फक्त तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत असेल तुमचे मागील नकारात्मक आयुष्य. तन मन धन झोकून द्या आणि जे तुमचे आहे त्यावर हक्क गाजवा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

परीक्षेच्या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढवून उत्तम मार्क कसे पाडायचे?



अनेक पालक सध्या माझ्याकडे मुलांच्या शिक्षणासंदर्भात तक्रारी घेवून येतात. अनेक पालक हे आता परीक्षा जवळ आली म्हणून अगदी घाई मध्ये येत आहे. त्यांना त्यांच्या मुलांच्या नापसाची भीती सतावत आहे आणि ह्यामुळे घरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनत आहे.

ह्यामुळे नवरा बायको, कुटुंबातील इतर सदस्य ह्यांच्यामध्ये भांडणे होत आहेत. म्हणजे वर्षातील आणि आयुष्यातील १० दिवसांच्या परीक्षेसाठी अनेक कटुता निर्माण होत आहे. आणी ह्या भांडणामुळे जोडीदारावर सर्व राग काढला जात आहे. अगदी लहान सहान चुका देखील मोठ्या करून सांगितल्या जात आहे.

शेवटी हाच ताण तणाव मानसिक आणि शारीरिक आजारात रुपांतरीत होतो. मग कुटुंबात सुखसमाधान आणि आरोग्याची जागा हि आजारपण ताण तणाव घेते.

फक्त एका परीक्षेसाठी आयुष्यात आणि कुटुंबात इतके तणाव आणण्यापेक्षा तज्ञांची मदत घेतलेली बरी. सर्वच उपाय आणि घरी करू शकत नाही आणि जर ह्या नकारात्मक भावना साठत गेल्या तर त्यामधून नकारात्मकताच बाहेर येईल. ह्यामुळे अनेक मुल यशस्वी देखील होतील पण ते फक्त बाह्य स्वरूपाने ना कि अंतर्मनाने. त्यांना सतत त्यांचे अंतर्मन, भावना आणि विचार हे आतल्या आत खात जातील.

इतके करण्यापेक्षा घरचे वातावरण हे आनंदी ठेवा. जास्त दबाव निर्माण करू नका. बंधने मर्यादेत आणा. जेव्हा देखील मुल अभ्यास करत असेल तर हळूच आपल्या जोडीदारासोबत बोला कि "मुलगा खूप हुशात आहे, आरामात पास होईल." हाच विचार तुमचा मुलगा पकडून ठेवेल व जरी मन लावून अभ्यास नाही केले तरी त्याच्या लक्ष्यात राहील कारण तुम्ही दाखवलेला विश्वास. विश्वास चमत्कार घडवतो.

त्याच्या नकळत त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवा. कुठे अडत असेल त्यावर उपाय शोधा. समजण्याचे एक नाही तर अनेक मार्ग आहे त्यापैकी तुमच्या मुलाला जो मार्ग सोयीस्कर वाटल किंवा ज्या मार्गाने समजेल, अंतर्मनात रुजेल त्या मार्गांचा वापर करा.

घरातील परीक्षेमुळे दुषित झालेले वातावरण काढून टाका. वास्तू शांती, वास्तू पूजा, यंत्रे ह्यांचा वापर करा. माझ्या स्पर्श उर्जा शास्त्राचा देखील वापर करू शकता. हे सर्व शास्त्र तुम्हाला तुमचे घर, शरीर शुद्ध करायला मदत करते व शुद्ध वातावरणात सकारात्मकता, भाग्य आणि चमत्कार निर्माण होवून तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटतो.

संमोहन देखील उत्तम शास्त्र आहे, ह्याचा वापर करून देखील तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये प्रोग्रामिंग करून घेवू शकता ज्यामुळे त्यांना परीक्षा पास होण्यास मदत होते. संमोहन शास्त्र आणि वरील शास्त्र ८० % रिझल्ट देतातच. हे शास्त्र तेव्हाच वापायचे जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे देखील सकारात्मक परिणाम येत नसतील तर.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मी जे वर उपाय सांगितले आहे त्याचा वापर दीर्घ कालावधीसाठी नका करू. वरील मार्ग फक्त उत्तेजन दिल्यासारखे आहे, ह्या मार्गाचा वापर फक्त जेव्हा कुटुंबात ताण तणाव वाढतो तेव्हाच करायचा आहे आईन त्यानंतर लगेच तज्ञांची भेट घ्यायची आहे. कायमस्वरूपी बदलासाठी दीर्घकाळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतात.

परीक्षा पास होणे सोपे आहे पण हे जे नकारात्मक विचार आणि भावना येतात ह्यामुळे हुशार विद्यार्थी देखील येत असून सुधा नापास होतो किंवा स्वतःला कमी मार्ग पाडून घेतो. तुमची मुल हि नैसर्गिक हुशार आहे. जर नैसर्गिक मार्गांनी ते यशस्वी होत असतील तर होऊ द्या, फक्त घरचे वातावरण ठीक ठेवा नाहीतर घरच्या समस्यांमुळे मुलांवर परिणाम होतो किंवा ते परिणाम करून घेतात.

वरील मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि सोबत तुम्हाला देखील. तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठीक ठेवण्यात मदत होईल.

appointment बुक करून तुम्ही माझ्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेवू शकता. ह्या कालावधी मध्ये रीस्पोंस जास्त असल्यामुळे जो पहिला येईल त्याला अटेंड केले जाईल.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक : Balak Palak Children Parents

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

नकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो?



आपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.

जी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल?

घरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल?

मानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

स्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल?

काही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील?

जर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल?

अति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील?

मुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल?

मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल?

लहान किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल?

घरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.

दुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल?

मुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.

स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.

पायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.

साधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय? मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.

अनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्यापासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला



नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला

आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवा, फक्त डोळ्यांनी नाही तर त्यांच्या भावनिक दृष्टीवर देखील लक्ष्य ठेवा. ह्या १५ वर्षांच्या मुलीने पहिले वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर तिने तिच्या प्रेमिला बोलावले आणि दोघांनी मिळून चाकूचे अनेक वार करून मारून टाकले. ते इथेच नाही थांबले, त्यांना शरीर कुठे नष्ट करायचे ह्यावरून भीती वाटली तर त्यांनी शक्कल लढवली आणि बाथरूम मध्ये त्या मुलीने स्वतःच्या वडिलांचे शरीर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

वडिलांचे वय काय तर ४५, पेशाने व्यवसायिक, ह्यांचे देखील समजावण्यामध्ये चूक झाली, त्यांनी पहिले समजून घेतले पाहिजे कि त्यांची मुलगी प्रेमात आंधळी तर झाली नाही ना? हे आंधळेपण भावनिक असते पण दुधारी असते, एकतर कमजोर करते किंवा इतके धाडस देते कि कुणाचा जीव घ्यायला देखील कमी करत नाही. खरे म्हणजे अश्या केसेस उघड झाल्या पाहिजे पण बदनामी होईल म्हणून कोणीही आपल्या घरच्या समस्या ह्या उघड करत नाही व तेव्हाच समजते जेव्हा कुठला गुन्हा घडतो.

अजून किती समाजाच्या दबावाखाली रहायचे? मरेपर्यंत? शेवटी गेलाच ना जीव? समाज काय आहे तिथेच अब्जो वर्षे राहील पण तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे समजा, मग महत्वाचे काय समाज कि तुमचा जीव?

इथे आडनाव जैन आहे, फक्त विशिष्ट समाजातून ती व्यक्ती येते म्हणून काय त्यांना समस्या नसतात काय? जैन असो, पाटील असो, कुलकर्णी असो किंवा कांबळे प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या आहेत प्रत्येक जन कौटुंबिक हिंसाचाराचा शिकार झालेला आहे. ह्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हि जवळच्या पोलीस स्टेशन किंवा कोर्टात केस चालू असताना भेटेल ती देखील पुराव्यासकट.

जात धर्म किंवा प्रांत अश्या तार्किक विचारांच्या समुहात तुम्ही राहत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही पण जेव्हा समविचारी, समकृतीशील, समभावना, सम भावनिक आणि शारीरिक गरजा असलेल्या लोकांसोबत राहिलात तर तुम्ही सुखी, समाधानी श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगू शकाल, प्रत्येक क्षण हा चमत्काराने भरलेला असेल, अश्या नकारात्मक घटनांपासून तुम्ही लांब रहाल किंवा त्यामधून लगेच बाहेर पडाल नाहीतर नाही.

वडिलांचे वय ४५ वरून व्यवसायिक, जर त्यांनी व्यवसायातील हुशारी देखील वापरली असती तरी त्यांना जीव गमावण्याची गरज पडली नसती. १५ आणि १८ वर्षांच्या मुलांच्या हातून मरण्याची वेळ आली नसती.

प्रत्येकाची एक मानसिक मर्यादा असते आणि एकदा का ती पार झाली तर त्या व्यक्ती शरण पत्करतील किंवा वार करतील. नुकतेच वयात आलेल्यांना कसे समजवायचे? त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यावर बघणाऱ्या मालिका आणी सिनेमावर वर विश्वास ठेवून ते त्याला वास्तव मानतात, गुन्हे करतात, आणि पोलीस लगेच पकडतात. खूप कमी लोक पोलिसांपासून पळू शकतात. श्रीमंत, सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय असतो ती गोष्ट वेगळी.

समजावून, थोडा वेळ देवून अनेकांना सुधारताना बघितले आहे पण जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्हाला देखील विरोधाचा सामनाच करावा लागेल, दररोज टोमणे मारणे, ओरडणे, मारणे ह्यामुळे तुम्हाला अजून वाईट परिस्थिती चा सामना करावा लागेल. आणि इज्जत काय फक्त मुली आणि स्त्रियांनी राखायची नसते तर पुरुषांनी आणि मुलांनी देखील राखायची असते.

मी स्वतः शेवटच्या बाकावर बसणारा मुलगा होतो, काळ सर्वकाही ठीक करते, जास्तीत जास्त लोकांचे चांगले होताना बघितले आहे. वयात मस्ती करण्याची देखील एक मर्यादा असते ती कधीही ओलांडायची नाही आणि कुठलेही वय हे मस्तीचे नसते, निसर्ग नियमानुसार आपले काम आहे जगण्यासाठीची धडपड करणे पैसा कमावणे त्यामुळे अश्या क्षणिक सुखाच्या मागे धावू नका.

हे आकर्षण आणि सेक्स फक्त क्षणिक सुख आहे, भले सेक्स हि मुलभूत नैसर्गिक गरज असली तरी इतर सर्व नैसर्गिक गरजांपैकी हि एक गरज आहे. सरासरी ६ मिनटे सेक्स चा कालावधी आहे, म्हणजे आपण सर्वकाही सांभाळून सेक्स साठी देखील वेळ देवू शकतो त्यामुळे इतके काही खून वैगरे करण्याची गरज नाही. आणि काळानुसार तुमची आवड देखील कमी कमी होत जाते.

सिनेमा वेगळा आणि वास्तव आयुष्य वेगळे, समाजाचे नियम घराबाहेर वेगळे आणि घरात पाळले जाणारे वेगळे, तुम्ही ह्या पृथ्वीवर काही क्षणासाठी आला आहात त्यामुळे आपल्या आयुष्यावर लक्ष्य केंद्रित करा, आपल्या कुटुंबावर लक्ष्य केंद्रित करा, प्रत्येक समस्येला उत्तर आहे, शांत मनाने नाही तर शांत भावनेने विचार करा आणि मार्ग काढा म्हणजे मार्ग निघेलच.

जर तुमच्या घरी देखील समस्या असतील तर आजच संपर्क करा, आपली सेवा हि ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज :

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

Image by Maret Hosemann from Pixabay