मानसशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानसशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शेअर बाजार, उद्योग व्यवसायात चढ उतार होत असतांना तुम्ही तुमचे मन आणि भावना शांत ठेवायला शिकला असाल तर तुमच्या आयुष्यात संघर्ष अस्तित्वात नाही.


अश्विनीकुमार

 

तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.


चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.


तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.


मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.


तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.


भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.


हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे  की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.


जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.


झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.


तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.


धन्यवाद

अश्विनीकुमार

आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची?




ध्यान:

झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.

जर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.



पहिला प्रकार

मन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.



दुसरा प्रकार

विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.



तिसरा प्रकार

तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.



तुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.



काहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.



व्यायाम :



जिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.



व्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.



काहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.



योग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.



व्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.



आहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.



आजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.



किती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्ही प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.



धन्यवाद

अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत


सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

मानसिक आजार २ डिप्रेशन



मानसिक आजार २

डिप्रेशन

डिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही पुस्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.

डिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची?

सहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते?

नाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते?

नाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.

विभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का?

नाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.

डिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का?

नाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.

डिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का?

नाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का?

हो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, हीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.

डिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का?

नाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.

डिप्रेशन वर उपचार होतात का?

हो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.

डिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का?

जर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.

डिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो?

जितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक?

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.


महत्वाचे मुद्दे

वेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.

आता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.

काही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.

समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.

व्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.

जिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.

कोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

Image by Free-Photos from Pixabay

पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?


पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?

पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग

संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग

वारसाहक्क

धार्मिक, सामाजिक नियमानुसार.

उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

नोकरी

धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.

व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.

मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.

आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.

जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.

जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.

तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.

आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.

जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.

रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf