याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. केंद्र शासनाच्या प्रेसमधून २ हजारच्या नोटा का बंद केल्या ? या नोटा न छापण्यामागची कारणे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. सध्या बाजारात या नोटांशी साधर्म्य असलेल्या बनावट नोटा आल्या असून त्या कशा आल्या याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
२ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. बाजारातील ८६ टक्के नोटा रद्द झाल्याने लोकांकडे व्यवहारासाठी पैसाच राहिला नाही. तेव्हा सरकाने २ हजार रुपयांची नवी नोट बाजारात आणली. २ हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करता येणार नाही, असा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र, त्या नंतर काही काळातच २ हजार रुपयांशी साधर्म्य दर्शविणाऱ्या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. या नोटांचे रंग चुकीचे आणि पुसट आहेत. नोटा छापण्यामध्ये अनेक चुका झालेल्या दिसून येत आहेत.
त्यामुळे पूर्वी ५०० रुपयांच्या नोटा घेताना लोक व व्यावसायिक जसे या नोटा पारखून घेऊ लागले होते. तशीच स्थिती आता २ हजार रुपयांच्या नोटाबाबत होऊ लागली आहे. त्यामुळे या नोटा बनावट असल्याच्या संशयाने अनेक ठिकाणी पोलीस त्या जप्त करीत आहेत. त्यात सरकारने नव्या २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचे वृत्त आल्याने आता याही नोटा बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.